त्या रेशमी क्षणाची
आठवण ठेवून गेली
माझ्या अव्यक्त भावना
जाताना घेऊन गेली
माझ्या सुंदर स्वप्नाची
चांदणी होऊन गेली
माझ्या अतृप्त दुःखसागरात
बिनदिक्कतपणे पोहून गेली
सुखाच्या चार क्षणाची
पाहुनी होऊन गेली
गडगडताना मात्र जलद
दामिनी होऊन गेली
माझ्या जीवनातील
अंधकार घालऊन गेली
तिचा तेवत जीवनदीप
कायमचा मालवून गेली
अजय कुलकर्णी सात्रेकर बीड
No comments:
Post a Comment