Friday, November 16, 2012

आचार्य अत्र्यांचे किस्से

-------------------------------------------------------------------------------------------------------   सहचारिणी



अत्र्यांची आर्थिक परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची गाडी बिघडली म्हणून ते पायीच कामासाठी निघाले.



तेवढ्यात रस्त्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला, त्याने ती संधी साधून खवचटपणें विचारले “काय बाबूराव, आज पायीच? गाडी विकली की काय?”



पण अशा प्रसंगी हार मानतील ते अत्रे कसले?



अत्रे म्हणाले, “अरे, आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाहीत बरोबर? कुणाबरोबर पळून-बिळून गेल्या की काय?”



विरोधक खजिल होऊन निघून गेला.   ------------------------------------------------------------------------------------------------------------ स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना आठ मुले होती.

त्याबद्दल अत्र्यांच्या ' मराठा ' वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असायची.

अत्र्यांनी गिरी , सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केला

आणि त्याखाली हेडिंग दिले

'' गिरी आणि त्यांची ' काम ' गिरी ''

----------------------------------------------------------------------------------------------------------   कार..



अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात

होते.

तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले

' काय बाबूराव आज पायी पायी , काय कार विकली की काय ?'

अत्रे म्हणाले. ' अरे आज तुम्ही एकटेच ? वहिनी दिसत नाही बरोबर ?

कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?   ------------------------------------------------------------------------------------------------------------ तुम्ही कोण रे टिकोजीराव ?



पुण्यातील एका बोळातून अत्रे एकदा सायकलवर चालले होते.

रस्याला उतार होता आणि नेमके त्यांच्या सायकलचे ब्रेक लागेनात

समोरून एका माणसाची प्रेतयात्रा येत होती.

जाताजाता अत्र्यांचा प्रेताला धक्का लागला आणि प्रेत खाली पडले.

लोक भडकले. अत्र्यांच्या अंगावर ओरडू लागले.

तेव्हा अत्रे शांतपणे म्हणाले ,

' अहो ज्याला धक्का लागला आहे तो काहीच बोलत नाही

आणि आरडाओरडा करणारे तुम्ही कोण रे टिकोजीराव ?'   ------------------------------------------------------------------------------------------------------------

एकदा पंगतीत बसले असताना, जेवण वाढायला आलेल्या बाईना अत्रे म्हणाले 'पातळ सोडून सर्व वाढा...'

-----------------------------------------------------------------------------------------------------------
कदा एक लेखिका अत्र्यांकडे काही चर्चा करायला आल्या होत्या. बोलता बोलता उशीर झाला तेव्हा त्या म्हणाल्या..


'अय्या, एवढे तास कसे गेले कळलंच नाही...'

तेव्हा अत्रे म्हणाले,

'अजून थोडा वेळ थांबलात तर दिवस कसे गेले तेही कळणार नाही....'..

.-----------------------------------------------------------------------------------------------------------
फाळणीच्या बाबतीत समाजवादी पक्षाने तटस्थ रहायचे ठरविले. या बाबतीत समाजवादी पक्षाचे पुढारी अच्युतराव पटवर्धन यांनी खुलासा करताना सांगितले, "आम्ही फाळणीच्या ठरावाला पाठिंबा दिला असता, तर आम्ही जातीयवादी ठरलो असतो आणि फाळणीला विरोध केला असता तर साम्राज्यवादी. म्हणून आम्ही तटस्थ रहायचे ठरवले." तेव्हा अत्रे थट्टेने म्हणाले, " लग्न केले तर आपण संसाराच्या जाळ्यात अडकतो, आणि ब्रह्मचारी राहिलो तर आपण निसर्गाच्या विरूद्ध वर्तन केल्यासारखे होते. म्हणून माणसाने लग्न न करता एखादी बाई ठेवावी, तसला तुमचा युक्तीवाद आहे."   ---------------------------------------------------------------------------------------------------   सेच अत्रे एकदा बाहेर फिरत होते तेव्हा त्यान्चे पोट सुटलेले होते, त्याच वेळी समोरुन एक स्त्री आली तिने हसतच अत्रेना त्यान्च्या पोटाकडे हात दाखवित विचारले " हा मटका किती रुपयाला देणार?" (बघा आता या बाईला काही गरज होती का?) अत्रेनी लगेच उत्तर दिल नळासकट चाळीस रुपये. -------------------------------------------------------------------------------------------------


आचार्य अत्रे आणि ना. सी. फडके यांच्यात बरेच वाद होते. त्यातुन बर्‍याचदा शाब्दिक चकमकी घडत.

एकदा फडके चिडून अत्र्यांना म्हणाले, "अत्रे, तुम्ही मुत्रे"

अत्रे हजरजबाबीपणे लगेच उत्तरले, " फकक्याने पुसले">>



हेच जोक मी असं ऐकलं होतं.

फडके: अत्रे, अत्रे म्हणजे गल्लितले कुत्रे.

त्यवरे अत्रे शांतपणे उत्तर देतात,

तुम्ही अगदी बरोबर बोललात, आम्ही कुत्रेच, आणि तुम्ही विजेचे खांब.

--------------------------------------------------------------------- हे जरा वेगळ्या पद्दतीणे ऐकलं होतं.

एकदा, अत्रे त्यांच्या मित्राच्या घरी जातात, मित्राच्या बायकोचं नाव कमल.

कमलः भाउजी, तुम्ही फार चांगले विनोद करता म्हणे, आज एखादा चांगला विनोद करुन दाखवा ना.

अत्रे: बरं ठीक आहे.

कमलः पण एक अट आहे, काना, मात्र, विलांटि, उकार काहीच नको, असं वाक्य असावं.

अत्रे: ठीक आहे, "कमल, परकर वरकर". --------------------------------------------------------------------------------- महाराष्ट्र कर्नाटक वाद सुरु होता.. प्रश्न होता बेळगावचा. कर्नाटकचे मंत्री म्हणाले, 'बेळि म्हणजे कन्नडमध्ये पांढरा.. नावात एक कन्नड शब्द आहे, म्हणून बेळगाव कर्नाटकातच पाहिजे.'

अत्रे म्हणाले, 'हाच नियम लावायचा झाला तर लंडन महाराष्ट्रात आणायला लागेल! ' ----------------------------------------------------------------------------------------